Operation Sindoor: भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवविले. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले असे सरकारने पत्रकार परिषदेत सांगितले. भारतीय लष्कराने ही कारवाई करून कोणते संकेत दिले आहेत आणि ऑपरेशन सिंदूरचे तीन महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ…

पहिला मुद्दा, बुधवारी भारताने केलेली ही कारवाई केवळ गेल्या महिन्यात पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तरच नव्हती. २००१ पासून झालेल्या दहशतवादी गैरकृत्यांना उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केवळ पहलगामवर लक्ष केंद्रित केले नाही, तर काही वर्षांपूर्वी संसदेवर झालेल्या हल्ल्यापासून ते पाकिस्तानने त्यानंतरही केलेल्या दहशतवादी कृत्यांना प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवविले गेले. हे दहशतवादी हल्ले पाकिस्तानस्थित आणि जैश-ए-मोहम्मद तसंच लष्कर-ए-तैय्यबासारख्या दहशतवादी गटांनी केले आहेत आणि त्या हल्ल्यांची जबाबादारीही त्यांनी स्वीकारली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या संघटनांना कित्येक वर्षांपूर्वीच दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे.

या दहशतवादी संघटनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात पाकिस्तान कायम अयशस्वी ठरले. भारताने २६/११ च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्करच्या दहशतवादी साजिद मीरचे उदाहरण दिले. साजिद मीर याला पाकिस्तानने आधी मृत घोषित केले आणि नंतर २०२२ मध्ये फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सने नियमांचे पालन करण्यासाठी केलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून त्याला अटकही कऱण्यात आली. या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF)च्या सक्तींमुळे एलईटी आणि जैश-ए-मोहम्मदने भारतातील दहशतवादी हल्ल्यांची थेट जबाबदारी घेतली नाही. उलट या संघटनांनी दि रेझिस्टन्स फ्रंट किंवा पीपल्स अँटी-फॅसिस्ट फोर्स उभारण्याकडे तसंच त्यांच्या कृत्यांना गैरधार्मिक किंवा गैरपाकिस्तानी सादर करण्यात हातभार लावला, त्यामुळेच पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सर्वात घृणास्पद म्हटले जात आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दोन्ही संघटनांच्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले.यामध्ये जेईएमचा मरकज सुभानअल्लाह (बहावलपूर), एलईटीचा मरकज तैयबा (मुरिदके) आणि एचएमची मेहमूना जोया (सियालकोट) यांचा समावेश होता. भारताने एकाच वेळी या सर्व स्थळांना लक्ष्य केल्याने केवळ पहलगामवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि टीआरएफसारख्या गटांना पाकिस्तानपासून वेगळे करण्याचा इस्लामाबादचा प्रयत्न फोल ठरला.

दुसरा मुद्दा, भारत सध्या पाकिस्तानी लष्कराला जाणूनबुजून लक्ष्य न करता नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमेवरील दहशतवादी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहे.
पाकिस्तानी हद्दीत हल्ले करण्याचे भारताचे जाहीर आवाहन २०१६ आणि २०१९ मध्ये स्वीकारलेल्या युक्तिवादाचे सातत्य दर्शविते. त्यावेळी लष्कराला लक्ष्य न करता नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध लष्करी कारवाई केली जाईल असे भारताने जाहीर केले होते. भारताच्या सीमापार लष्करी कारवाईचे हे वैशिष्ट्य फेब्रुवारी २०१९ मध्ये तत्कालीन परराष्ट्र सचिवांच्या विधानात स्पष्ट झाले होते. बुधवारी संरक्षण मंत्रालयाच्या प्रेस रिलीजमध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही असे सांगितले; म्हणजेच भारत दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दहशतवादी पायाभूत सुविधा आणि पाकिस्तानी लष्करी लक्ष्यांमध्ये फरक ओळखतो.

२०१६ मध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईकने पीओकेमधील नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. २०१९ मध्ये भारताने नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या निर्विवाद पाकिस्तानमधील तळांवर (जब्बा टॉप, बालाकोट) हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या लक्ष्यांसह, पाकिस्तानातील लक्ष्यांवरही हल्ला केला.

तिसरा मुद्दा, पाकिस्तानवर हल्ला करताना भारताने असे संकेत दिले आहेत की त्यांना पूर्णपणे युद्ध करायचे नाही.
भारताने ऑपरेशन सिंदूरचे वर्णन केंद्रित, मोजून मापून आणि गैरकृत्याच्या विरुद्ध असे केले आहे.
दरम्यान, या हल्ल्यांमुळे भारताविरुद्ध पाकिस्तानची दक्षता आणि २३ एप्रिल ते ६ मेदरम्यान त्यांनी भारताला दिलेल्या धोक्यांची विश्वासार्हता निर्णायकपणे भेदली आहे.
पाकिस्तानने आता केलेली कोणतीही कृती अधिक तीव्र क्षमता घेऊन येईल आणि जर त्यामुळे भारताच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली तर भारताला पाकिस्तानी लष्कराच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा मार्ग मोकळा होईल.