Chhatrapati Shivaji Maharaj and Battle of Basrur: १९ फेब्रुवारी हा शिवजयंतीचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप वर्णावा तरी किती? महाराजांच्या अगणित महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक निर्णय म्हणजे स्वराज्याच्या आरमाराची उभारणी. याच मराठा आरमाराच्या इतिहासातील पहिली लढाई म्हणजे ‘बसरूरची लढाई’ होय. त्याचाच घेतलेला हा आढावा!
आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच
“आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य मेव करावे.” असा संदर्भ रामचंद्र पंत अमात्यकृत ‘आज्ञापत्रा’त सापडतो. महाराजांच्या याच दूरदृष्टीची प्रचिती आपल्या बसरूरच्या लढाईच्या माध्यमातून येते. १४ मार्च १६६५ रोजी कारवारहून सुरतेला पाठवलेल्या एका इंग्रजी पत्रात या स्वारीबद्दल उल्लेख आहे. बसरूरची स्वारी ही मराठा आरमाराची पहिली ओळख होती. ज्याचे दूरगामी परिणाम झाले. या स्वारीमुळेच भारताच्या मध्ययुगीन इतिहासात पहिल्यांदाच एक राजा युद्धाच्या दृष्टीने स्वतःची परिपूर्ण जहाजे घेऊन स्वतः आरमारी स्वारीचे नेतृत्त्व करतो ही घटनाच अचंबित करणारी होती. या स्वारीमुळे आरमारी युद्ध, किनाऱ्यावरील किल्ले, बंदरे आणि भूगोलाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले. १३-१४ फेब्रुवारी १६६५ च्या पहाटे मराठा नौदलाच्या ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ च्या गर्जनेने पोर्तुगीज सैनिकांना जाग आली. मराठा नौदलाने पोर्तुगीजांना पराभूत केलेल्या या युद्धामुळे बसरूरमध्ये स्वराज्याचा भगवा ध्वज फडकला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
