२३ नोव्हेंबरच्या पहाटे मुंबईत एका मोठ्या कार अपघातात एका १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर अभिनेता सोनू सूदने अपघात रोखण्यासाठी पाण्याने भरलेले क्रॅश बॅरिअर्स बसवण्याचा सल्ला दिला. बॉलीवूड चित्रपट निर्मात्याच्या मुलाची कार विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दुभाजकावर आदळली; ज्यात त्या मुलाचा मृत्यू झाला. यावेळी तो आपल्या तीन मित्रांबरोबर होता. सोनू सूद विशेषतः करोनामध्ये लॉकडाऊनच्या काळात त्याने केलेल्या अनेक मानवतावादी कार्यांसाठी ओळखला जातो. सोनू सूद याने २८ नोव्हेंबर रोजी ‘एक्स’वर पोस्ट केले, “मला एका लहान मुलाबद्दल ऐकून खूप वाईट वाटले, ज्याच्या कारचा अपघात झाला आणि त्याने आपला जीव गमावला. मला असे वाटते की, जर आपल्या देशात प्रत्येक रस्ता दुभाजकावर पाण्याने भरलेले क्रॅश बॅरिअर्स बसवले, तर आपण लाखो जीव वाचवू शकतो. प्रत्येक रस्त्यावर ही प्रणाली कार्यान्वित करणे अनिवार्य केले पाहिजे.” ही प्रणाली नक्की काय आहे? त्यामुळे खरंच अपघात रोखले जाऊ शकतात का? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा