-दत्ता जाधव
यंदाच्या साखर हंगामात विक्रमी साखर उत्पादन होणार असताना, जागतिक बाजारात चांगली मागणी आणि दर तेजीत असताना, देशांर्तगत मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त साखर शिल्लक राहण्याची शक्यता असतानाही, साखर निर्यातीवर निर्बंध लादण्यामागील कारणे काय?

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

यंदाचा साखर हंगाम काय सांगतो?
वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोशिएशनने (विस्मा) दिलेल्या माहितीनुसार यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात १०७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक होता. यंदाच्या हंगामात २५ मेअखेर देशात सुमारे ३५० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. अद्याप देशातील साखर कारखाने सुरू असल्याने त्यात अजून सुमारे ४०-५० लाख टनांची भरच पडणार आहे. म्हणजे आजघडीला देशात सुमारे ४५० लाख टन साखरेचा साठा देशात आहे. अतिरिक्त ऊस गाळप करण्याचे आव्हान महाराष्ट्रातील कारखान्यांसमोर आहे. शिल्लक उसाच्या गाळपासाठी आंदोलने होत आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकार गाळपासाठी अनुदान देत आहे. याचा अर्थ एवढाच की आजवरचे विक्रमी साखर उत्पादन देशात होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar export curbs and their impact print exp scsg
First published on: 26-05-2022 at 09:36 IST