स्वमालकीचे धरण नसल्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या स्रोतांवर अवलंबून असलेल्या ठाणे महापालिकेला वाढत्या नागरीकरणामुळे पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाने भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पुढील ३० वर्षांचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. यानुसार शहराला प्रतिदिन १११६ दशलक्षलिटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे. वेगवेगळ्या स्रोतांमार्फत हे वाढीव पाणी मिळविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असले तरी हा कोटा मंजूर होईपर्यंत टंचाईवर तात्पुरती मात करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. यातूनच प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी मुंबई महापालिकेकडून प्रतिदिन २५ दशलक्षलिटर इतके वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यास मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येत्या काही दिवसांत ठाण्याला वाढीव पाणी मिळण्याची चिन्हे आहेत. या पाण्यामुळे ठाण्यातील पाणी टंचाईच्या झळा कमी होतील का आणि कोणत्या भागाला वाढीव पाण्याचा फायदा होऊ शकेल, याविषयी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा