भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या वर्षभरात अनेक नवीन परदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास उत्साह दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक बँकांचे प्रमुखही भारतातील शेअर बाजाराला भेट देत असून, तिथे संपत्ती खरेदी करण्याबरोबरच नवे कर्मचारी नियुक्त करीत आहेत. करोना महामारीनंतरच्या तेजीने भारताच्या शेअर बाजाराचे मूल्य सुमारे ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवले. खरं तर सद्यस्थितीत शेअर बाजाराचे ते मूल्य हाँगकाँगच्या बरोबरीचे आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे वॉल स्ट्रीटही आता भारताकडे दुर्लक्ष करू इच्छित नाही.

मुंबईत परदेशी गुंतवणूकदारांसाठी प्रवेशाचे अनेक मार्ग आहेत. मुंबई खरं तर २६ दशलक्ष लोकसंख्येचे बंदर शहर आहे, त्याची अनेक उपनगरेही आहेत. त्यामुळे मुंबईला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. सी लिंक आणि मेट्रोच्या जाळ्यामुळे मुंबईला वेगळे महत्त्व मिळाले असले तरी तिथे पसरलेल्या झोपडपट्ट्यासुद्धा पाहायला मिळतात. दिवसागणिक प्रवासी रेल्वेची गर्दीही वाढत चालली आहे. मुंबई हे आठ दशकांपासून भारताचे व्यावसायिक केंद्र राहिले आहे, परंतु गेल्या दोन वर्षांपासून मुंबई हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे शहर ठरत आहे. आता उत्तर अमेरिकन पेन्शन व्यवस्थापक, पर्शियन गल्फ आणि सिंगापूरमधील सार्वभौम संपत्ती निधी, जपानी बँका आणि खासगी इक्विटी कंपन्या भारतात आपल्या व्यवसाय वाढीचा एक मार्ग शोधत असून, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहेत. भारताची प्रगतीही कोणीही रोखू शकत नसले तरी अनुभवी जुनी मंडळी अद्यापही नवी कल्पना अंगीकारू इच्छित नसल्याचंही पाहायला मिळतंय.

विशेष म्हणजे भारतात पैसे कमावणे म्हणावे तितके सोपे नाही, कारण भारतीय गुंतवणूकदार इथे पहिल्यापासून स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. भारतीय कंपन्यांच्या सध्याच्या नफ्याच्या तुलनेत त्यांच्या शेअरच्या किमती जास्त आहेत. परकीय गुंतवणूकदारांना अद्याप भारतात गुंतवणुकीसाठी योग्य मार्ग सापडत नाही आहेत. पंतप्रधान मोदींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आले असले तरी मे महिन्यात मुंबईतील बाजारपेठेत म्हणावे तितके उत्साहवर्धक वातावरण नव्हते. मोदी सरकार पुन्हा सत्तेत न आल्यास भारतीय अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी भीतीही दूरच्या गुंतवणूकदारांना वाटत असून, ते आतापासूनच सावध झाले आहेत.

मुंबईच्या बाजारपेठेत सातत्याने पैशांचा ओघ सुरू असला तरी परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीचा मार्ग शोधण्यात अडचणी येत आहेत. ज्यामुळे थेट गुंतवणूक करण्यास बरेसचे परदेशी गुंतवणूकदार टाळत आहेत. भारताच्या संभाव्य मोठ्या ग्राहकांच्या खर्चाची मागणी अपेक्षेपेक्षा कमी आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त खर्च होत आहे, तर शेकडो लाखो लोक अजूनही गरिबीत अडकलेले आहेत. गुंतवणूकदारांच्या उत्साहाचे कारण खरं तर भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजी आहे. कारण तशा ताकदीची इतर मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये सध्या कमतरता आहे. सध्या परदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे आकर्षित व्हायला हवे. कारण त्यांचे चलन स्थिर असून, अर्थव्यवस्थेत सातत्याने वाढ होते आहे. जागतिक गुंतवणूकदारांनाही गुंतवणुकीसाठी भारत चांगला पर्याय वाटत आहे. चीन अन् रशियाची अवस्था सध्या बिकट आहे. चीन अन् अमेरिका व्यापारयुद्धाच्या धमक्याही नेहमीच्याच झाल्या आहेत. युक्रेनवर आक्रमक केल्यानंतर २०२२ मध्ये अमेरिका, युरोप आणि त्यांच्या मित्र देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले असून, रशियाच्या अर्थव्यवस्थेतला धक्के देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळेच सध्या भारतात गुंतवणूक करणे फायद्याचे असल्याचेही परदेशी ग्राहक असलेले भारतातील बँकर म्हणाले आहेत. गुंतवणूकदारांनी भारतात मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवणे हे खरं तर वॉल स्ट्रीटसाठीसुद्धा धोक्याची घंटा आहे.

मॉर्गन स्टॅन्लेने सुरू केलेल्या उदयोन्मुख बाजारांचा प्रभावशाली स्टॉक इंडेक्स एमएससीआयनेसुद्धा जागतिक स्तरावर चीनचे प्रतिनिधित्व कमी करताना भारताचे रँकिंग २०२० मध्ये ८ टक्क्यांवरून वाढवून १८ टक्क्यांहून अधिक वाढवले आहे. विशेष म्हणजे जेपी मॉर्गन चेसनेही त्यांच्या उदयोन्मुख बाजार निर्देशांकात भारतातील सरकारी रोखे जोडले आहेत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड अधिक भारतीय वित्तीय संपत्ती विकत घेत आहेत. गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध असलेली बँक जेफरीजचे भारतातील प्रमुख आशिष अग्रवाल हे २० वर्षांहून अधिक काळ मुंबईत व्यवहार करीत आहेत. भारतात गुंतवणुकीबद्दल कसलीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे ते सांगतात. भारतीय शेअर्स चीनच्या तुलनेत जास्त चांगली कामगिरी करीत आहेत. भारताच्या बाजारपेठादेखील इतर अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत इतर कंपन्यांना जास्त आकर्षित करीत आहेत. सॅमसंगशिवाय कोरियाचा किंवा महागड्या आणि ब्रँडेड वस्तूंसाठी लॅटिन अमेरिकेशिवाय इतर कोणाचा विचार करू शकत नाही,”. “तसेच इंडेक्स म्हणून भारत हा नावारुपाला आला असून, तो अमेरिकेच्या बाहेरही आपला दबदबा कायम ठेवून आहे.” कॅलिफोर्नियातील Lafayette मधील केविन कार्टर यांनीसुद्धा EMQQ ग्लोबल नावाची गुंतवणूक कंपनी स्थापन केली, जी एक्सचेंज ट्रेडेड फंड विकते, ज्यामुळे सामान्य लोकांना उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करणे सोपे जाते. भारतातील इंटरनेट आणि ई-कॉमर्स क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका फंडाचे मूल्य गेल्या वर्षभरात जवळपास ४० टक्क्यांनी वाढले आहे. भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या उदयोन्मुख बाजारपेठांना यशस्वी करण्यास मदत केली आहे. मोठ्या लोकसंख्येबरोबरच तरुण पिढी अन् आर्थिक वाढीमुळे लोकांची क्रयशक्ती वाढली आहे.

१.४ अब्ज लोकसंख्येसह गणनेत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. युरोप किंवा पूर्व आशियातील रहिवाशांच्या तुलनेत भारतीयांचे कामाचे वयही जास्त आहे. भारताचा आर्थिक विकास दर ७ टक्क्यांच्या आसपास असून, त्याची जागतिक सरासरी पाहायला गेल्यास ती ३.२ टक्क्यांच्या तुलनेत आहे. काही गुंतवणूकदारांना १५ वर्षांपूर्वीचा तो काळ आठवतो, जेव्हा भारत चीनच्या आर्थिक वाढीच्या दराला मागे टाकण्याचा विचार करीत होता. २००८ ते २०२० पर्यंत चीनचे दरडोई उत्पन्न चौपट तर भारताचे २.५ पटीने वाढले.

इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या ताज्या आकडेवारीनुसार, काँगो प्रजासत्ताक आणि निकाराग्वा यांमधील उत्पन्नाच्या राष्ट्रीय क्रमवारीत भारताचा १३८ वा नंबर लागतो. चीन सध्या ६५ व्या स्थानावर होता. पण भारत चीनपेक्षा खूप वेगाने पुढे जात आहे. भारत सार्वजनिक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे, खरं तर हे मोदींच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील धोरणांचे वैशिष्ट्य असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुंबईतच २००८ मध्ये फक्त तीन गगनचुंबी इमारती होत्या, या वर्षाच्या अखेरीस त्यात शेकडोंनी भर पडली आहे. शहराचे महत्त्वाचे केंद्र वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKCच्या मध्यभागी पसरलेले आहे. One BKC टॉवर, बँक ऑफ अमेरिका आणि स्वित्झर्लंडची विमा कंपनी स्विस रे आणि इतर अनेकांची आलिशान घरं मुंबईतच आहेत. ब्लॅकस्टोन या जगातील सर्वात मोठ्या खासगी अन् इक्विटी समूहाने २०१९ मध्ये ३०० दशलक्ष डॉलरमध्ये अपार्टमेंट खरेदी केले होते.

मुंबई म्हणजे अर्थातच शेअर बाजाराचेही माहेरघर असल्याचे म्हटल्यास अचूक ठरेल. वेगाने विस्तारणाऱ्या शेअर बाजाराने गुंतवणूकदार वर्गाला फायदा आणि बचतीसाठी आकर्षित केले आहे. बँकांमुळेसुद्धा मध्यम उत्पन्न असलेल्या भारतीय कुटुंबांना थेट गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. डेरिव्हेटिव्हजच्या जोखमीच्या व्यापारावर अनेक नवोदित गुंतवणूकदारांनी पैसे गमावले असले तरी इतर सिक्युरिटीजशी जोडलेला गुंतवणूकदार चांगला फायदा कमावत आहेत. Invest India च्या व्यवस्थापकीय संचालिका आणि CEO सुश्री निवृत्ती राय यांनीही भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्या म्हणाल्या की, “मी एक स्त्री आहे, मी तंत्रज्ञानातून पुढे आले आहे, एका बहुराष्ट्रीय कंपनीतून नावारुपाला आले असून, मी भारतीय आहे. अधिक दीर्घकालीन परदेशी निधीमुळे भारतीय रुपया मजबूत आणि स्थिर होण्यास मदत होणार आहे. आर्थिक वचनबद्धता दाखवणारे गुंतवणूकदारदेखील तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्ही भांडवल गमावत असून, काही ठिकाणी तंत्रज्ञानाचा अभावसुद्धा असू शकतो,” असेही त्या म्हणाल्या.

सुश्री राय यांचे १०० अब्ज डॉलर थेट विदेशी गुंतवणूक मिळवण्याचे मोठे लक्ष्य आहे. २०२१ मध्ये भारताने जे काही ठरवले, त्यापेक्षा ते निश्चितच जास्त आहे. गेल्या वर्षी हा आकडा १६.८ टक्क्यांनी घसरून २८ अब्ज डॉलरवर आला. २०२३ मध्ये जगभरातील अनेक ठिकाणी परकीय गुंतवणूक कमी झाली आहे, परंतु त्याचा चीनप्रमाणे भारतालाही विशेष फटका बसला आहे. मोदींनी स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त २०४७ पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत दहापट वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. देशाला आणखी वेगवान वाढीची आवश्यकता असेल आणि याचा अर्थ आम्ही परदेशी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही सुश्री राय यांनी सांगितले.