काय होईल जर भारताने आपल्या एखाद्या शत्रू राष्ट्रांवर अण्वस्त्र हल्ला केला तर? प्रश्न काल्पनिक आहे. पण आजच्या भू-राजकीय जगावर नजर टाकली तर या काल्पनिक प्रश्नातही सत्ये दडलेली आहेत. भारताच्या आण्विक सिद्धांतानुसार, आपला देश प्रथम अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या धोरणाचे पालन करतो. म्हणजेच भारत पहिला अणवस्त्रांचा वापर करणार नाही. देशाचे अण्वस्त्र धोरण हे देखील सांगते की, भारतावर किंवा भारतीय सैन्यावर कोठेही जैविक किंवा रासायनिक शस्त्रांनी मोठा हल्ला झाल्यास भारत अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या पर्याय निवडेल.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

भारताच्या आण्विक धोरणाचे विश्लेषण करताना असे दिसून येते की, की भारत अण्वस्त्रांचा तेव्हाच वापर करेल जेव्हा आपला देश ‘महाविनाशा’च्या दारात उभा असेल. मग भारताच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात येणाऱ्या या हल्ल्याची प्रक्रिया कशी असते? तर पंतप्रधान कार्यालयात असलेल्या अत्यंत गोपनीय फायलींमध्ये या संदर्भातील प्रतिक्रियेची माहिती आहे. भारत सरकारने अण्वस्त्र हल्ल्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी न्यूक्लियर कमांड अथॉरिटी (Nuclear Command Authority) तयार केली आहे. यानुसार अण्वस्त्र हल्ल्याबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राजनैतिक परिषद असते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the prime minister need to get the presidents approval to carry out a nuclear attack dpj
First published on: 17-06-2022 at 20:56 IST