loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

एरवी असेच चेष्टामस्करी करणारे गोरखे जेव्हा अंगावर लष्करी गणवेश चढवतात आणि ‘जय महाकाली, आयो गोरखाली’ असा जयघोष करत म्यानातून कुकरी (नेपाळी भाषेत खुकुरी) बाहेर काढून रणांगणात उतरतात तेव्हा ते जगातील सर्वात घातक योद्धे बनलेले असतात. अडचणीच्या काळात जेव्हा अन्य सैनिक किंवा रेजिमेंट्स एखादे ठाणे सर करण्यात असफल ठरतात, तेव्हा विजयश्री खेचून आणण्यासाठी सेनानींच्या ओठांवर एकच आज्ञा येते, ‘सेंड इन द गोरखाज!’ आणि गोरखा योद्धय़ांनी ही ख्याती प्रत्येक वेळी प्राणपणाने जपली आहे.

नेपाळच्या सांस्कृतिक जीवनात कुकरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेथील गुरुंग, मगर, राय, लिंबू या समाजघटकांत घरोघरी कुकरी बाळगली जाते. कुकरीचा उगम नेमका कसा आणि केव्हा झाला याची निश्चित माहिती नाही. काही अभ्यासकांच्या मते अलेक्झांडरने जेव्हा भारतावर आक्रमण केले तेव्हा येथील स्थानिक लोहारांनी ग्रीक सैनिकांच्या कोपिस आणि माशिरा या तलवारींची नक्कल आणि त्यात बदल करून कुकरी बनवली. तर काहींच्या मते नेपाळमधील लिच्छवी शासकांच्या पूर्वी सातव्या शतकात सत्तेवर आलेल्या किरातींनी कुकरीचा वापर सुरू केला; तर काही अभ्यासक १३ व्या शतकात नेपाळच्या मल्ल शासकांच्या काळात कुकरीचा उगम झाल्याचे मानतात.

कुकरी आणि गोरख्यांचा प्रताप बाह्य़ जगाला माहीत झाला तो साधारण २०० वर्षांपूर्वी. ब्रिटिशांनी १८१५ साली नेपाळ जिंकण्याचा प्रयत्न केला. पण गोरखा योद्धय़ांच्या पराक्रमाने ते प्रयत्न हाणून पाडले. त्या युद्धात ब्रिटिशांनी गोरखे आणि कुकरीचा प्रसाद चाखला. त्याने ते चांगलेच भयचकित झाले आणि त्याचवेळी गोरख्यांच्या प्रेमातही पडले. त्यांनी या पराक्रमी योद्धय़ांना गोडीगुलाबीने वापरून घेण्याचे ठरवले आणि तह केला. तेव्हापासून गोरखे ब्रिटिशांच्या लष्करात दाखल झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश काही गोरखा रेजिमेंट्स ब्रिटनला घेऊन गेले. त्यांना रॉयल गोरखाज म्हणतात. आजही दरवर्षी ब्रिटिश आणि भारतीय लष्कर नेपाळमधून गोरख्यांची भरती करते. गेल्या २०० वर्षांत गोरख्यांनी दोन्ही महायुद्धांसह, १९८२ चे फॉकलंड बेटावरील युद्ध, तसेच आजच्या इराक आणि अफगाणिस्तानच्या संघर्षांत मर्दुमकी गाजवली आहे.

कुकरीचा आकार आणि रचना वार करण्यास आणि कापण्यास अत्यंत उपयुक्त आहे. कुकरीच्या म्यानाबरोबर दोन छोटेसे चाकू असतात. त्यांना ‘करडा’ आणि ‘चकमक’ अशी नावे आहेत. करडा हा निमुळता आणि धारदार असून कापण्याच्या लहानसहान कामांसाठी वापरतात. चकमक बोथट असतो. तो जेव्हा धार लावण्याचा दगड उपलब्ध नसेल तेव्हा कुकरीला धार लावण्यासाठी वापरतात. कुकरीच्या पात्याच्या तळाशी, मुठीजवळ एक लहानशी अर्धगोलाकार खाच असते. ती शत्रूचे रक्त कुकरी वापरणाऱ्याच्या हातावर ओघळू नये आणि जमिनीवर सांडावे या हेतूने केलेली असते. त्यामुळे हात ओला होऊन कुकरी निसटत नाही. बरेचदा ही खाच गायीच्या खुराच्या आकाराची असते. गोरखा कधीच महिला आणि बालकांवर वार करत नाही. त्या शपथेची आठवण पवित्र गायीच्या पायांची खूण पाहून व्हावी अशीही त्यात योजना असावी. नेपाळचे महाराजा पद्मसमशेर जंगबहादूर राणा यांनी म्हटले आहे, ‘कुकरी हे गोरख्यांचे राष्ट्रीयच नव्हे तर धार्मिकही शस्त्र आहे. जागेपणी ते हाती बाळगणे आणि झोपताना ते उशाशी जपणे हे गोरख्यांचे आद्य कर्तव्य आहे.’

sachin.diwan@expressindia.com