गणेशोत्सव आणि गाणी यांचे एक अतूट नाते आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये, सार्वजनिक मंडळांमध्ये काही ठराविक गाणी कायम लावली जातात. काळ बदलत गेला, नवनवीन गाण्यांच्या सीडी, कॅसेट्स बाजारात आल्या. मात्र काही गाणी अशी आहेत ज्यांची नवलाई गेले कित्येक वर्ष तशीच्या तशीच आहे. त्यामुळेच दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये ही गाणी आवर्जुन लावली जातात. चला तर मग पाहुयात गणपतीच्या काळात लावली जाणारी लोकप्रिय गाणी-

१. ओंकार स्वरूपा –
ओंकार स्वरुपा या गीतसंग्रहातील हे गाणं लोकप्रिय गायक सुरेश वाडकर यांनी गायलं असून श्रीधर फडके यांच्या संगीताचा साज या गाण्याला चढला आहे. या गाण्याची मूळ रचना संत एकनाथ यांनी केलं आहे. १९८७ पासून लोकप्रिय ठरलेलं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Central Government Launches Dekho Apna Desh People s Choice 2024 Survey
देशातलं कोणतं पर्यटनस्थळ ठरणार सर्वांत लोकप्रिय? होणार ऑनलाइन मतदान!

२. पार्वतीच्या बाळा –
गणपतीसमोर हमखास लावलं जाणारं गाणं म्हणजे ‘पार्वतीच्या बाळा’. या गाण्यातील आनंद शिंदे यांच्या आवाजाने परिसर दुमदुमतो. हे गाणं दुसऱ्या कोणाच्या आवाजात ऐकलं तरी ती मजा येत नाही. त्यामुळे दरवर्षी हे गाणं गणेशोत्सवात आवर्जुन लावलं जातं.

३. अष्टविनायका तुझा महिमा कसा –
१९७९ साली प्रदर्शित झालेल्या अष्टविनायक या चित्रपटातील अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्याला अनुराधा पौडवाल, जयवंत कुळकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश आणि शरद जांभेकर यांचा स्वरसाज चढला आहे. तर जगदीश खेबुडकर यांनी गाण्याची रचना केली आहे. या गाण्याला अनिल-अरुण यांनी संगीत दिलं आहे.

४. उठा उठा सकळीक –
गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याचं संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे. तर रचना रामानंद यांनी केली आहे.

५. तुज मागतो मी आता –
हे गाणं रामकृष्ण बापू सोमयाजी यांनी रचलं असून लता मंगेशकर यांनी गायलं आहे. तर संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे.

६. अशी चिकमोत्याची माळ-