गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केले. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
शक्य असेल त्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत, नागरिकांना रहदारी, आरोग्य, वीज भारनियमन यांची समस्या जाणवणार नाही याची काळजी घ्यावी तसेच गणेशोत्सव मंडळांनी गणेशभक्तांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.