” मानवी शरीराला आतून पोखरून काढणारा आजार कोणता?” असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल, ’एड्‍स’. प्रत्यक्षात मात्र एड्स हा आजार केवळ रोगप्रतिकारशक्ती कमजोर करतो, तर मधुमेह शरीरातल्या प्रत्येक अवयवाला विकल करतो. “२१व्या शतकामध्ये भारतीयांच्या अकाली मरणाला कारणीभूत होणारा रोग कोणता?” असा प्रश्न विचारला तर सहसा उत्तर येईल ,”कॅन्सर”. प्रत्यक्षात मात्र कॅन्सरमुळे जितके लोक मरतात त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक मधुमेहजन्य विकृतींमुळे मृत्युमुखी पडतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मागील ५०-६० वर्षांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. जगप्रसिद्ध ’लॅन्सेट’ या वैद्यक नियतकालिकाच्या म्हणण्यानुसार १९८० मध्ये जगामधील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जी दहा करोड ८० लाख होती, ती २०१४ मध्ये ४२० करोड झाली. यातले अर्ध्याहून अधिक रुग्ण हे भारत, चीन, अमेरिका, ब्राझिल व इंडॊनेशिया या पाच देशांमध्ये आहेत. आपल्या देशामधील मधुमेही रुग्णांच्या संख्येमध्ये झालेली भयावह वाढ नेमक्या आकड्यांमध्ये सांगायची तर १९८० मध्ये भारतामध्ये एक करोड १९ लाख लोक मधुमेहाने ग्रस्त होते, जी संख्या २०१४ मध्ये सहा करोड ४५ लाख झाली. त्यामध्येसुद्धा १९८०मध्ये पुरुषांमधील मधुमेहाचे प्रमाण जे ३.७% होते, ते जवळजवळ तिपटीने वाढून ९.१% झाले, तर स्त्रियांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ४.६% होते, ते ८.३% झाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi symptoms of men and women diabetes in india
First published on: 16-03-2017 at 10:00 IST