आपल्या देशामधील बहुतांश उत्सव व सण साजरे करण्यामागे सामाजिक हिताचा, त्यातही समाजाच्या शारिरीक व मानसिक आरोग्याचा विचार केलेला दिसतो. एकत्रितपणे साजरे केले जाणारे उत्सव हे समाजात परस्परांशी ओळख होण्या-वाढण्यासाठी, बंधुभावना निर्माण होण्यासाठी; एकंदरच समाजाला संघटित करुन ऐक्य टिकून राहण्यासाठी अत्यावश्यक आहेत, याबद्दल काही शंका नाही, जी परंपरा पुढेही चालू राहायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने जाळून शेतकरी आपल्या जमिनीला अधिक सुपीक बनवू पाहायचा. होळीच्या निमित्ताने कडूनिंब-एरण्ड यांसारखी औषधी झाडे जाळण्यामागे थंडीनंतर सुरु होणार्‍या उन्हाळ्याच्या या ऋतुसंधिकाळामध्ये फैलावणा-या रोगजंतुंचा व परिसरातल्या त्रासदायक किटकांचा नाश करणे हासुद्धा एक महत्त्वाचा हेतू पुर्वजांनी योजिला होता. या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हा एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा; सर्वत्र गर्द रान व घनदाट जंगल असताना त्या काळाला व पर्यावरणाला अनुरूप असा तो उत्सवाचा विधी होता. मात्र ज्या काळामध्ये एक-एक झाडाचे नितांत महत्व आहे, त्या झाडांसाठी आसुसलेल्या आजच्या २१ व्या शतकाला झाडे जाळण्याचा तो विधी काही लागू होत नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to celebrate safe holi and rang panchami holi dahan 2017 also holi puja timing
First published on: 11-03-2017 at 09:37 IST