असे का होते?
आयुर्वेदानुसार, वाढणारी उष्णता व शरीरातील जास्तीचे पित्त यामुळे अंत:त्वचेला इजा होऊन तोंड येते. पोट साफ नसेल तर हे लवकर बरे होत नाही.
उपाय काय?
* १०-१२ काळे मनुके रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते सकाळी बारीक चावून खावे.
* सकाळी-सायंकाळी एक-एक चमचा गुलकंद खावा.
* जखमांना ज्येष्ठमध किंवा शुद्ध गेरूची पूड लावावी.
* अंजीर, द्राक्ष ही फळे खावीत. आहारात दूध, नारळ पाणी, कोथिंबीर यांचा समावेश असावा.
* रोज रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.
यामुळे काय होते?
* पोट साफ होऊन वाढलेले पित्त शरीराबाहेर पडते. जखमा लवकर बऱ्या होतात.
इतर काय काळजी घ्यावी?
* आंबट, तिखट, खारट पदार्थ (उदा. दही, मसाले, लोणचे, इत्यादी.) खाऊ नयेत.
* साधे उकडलेले जेवण घ्यावे.
* जास्त बोलणे व जागरण टाळावे.
वैद्य सदानंद सरदेशमुख

Guru Asta 2024
३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन