आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सूर हरवलेल्या विराट कोहलीला अखेरीस सूर गवसला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात १९७ धावांचा पाठलाग करताना दुबईच्या मैदानावर RCB च्या संघाची खराब सुरुवात झाली. फॉर्मात असलेला पडीकल, फिंच, डिव्हीलियर्स हे सर्व फलंदाज लवकर माघारी परतले. परंतू विराट कोहलीने एक बाजू लावून धरत दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. मैदानावर स्थिरावत कोहलीने ३९ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराटने टी-२० क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा ओलांडलणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. २७० डावांमध्ये विराटने ही कामगिरी करुन दाखवली आहे. Virat Kohli becomes the first Indian and 7th player overall to complete 9000 runs in T20 cricket. #IPL2020 #RCBvDC— Bharath Seervi (@SeerviBharath) October 5, 2020 Innings taken to complete 9000 T20 runs:249 - Gayle270 - KOHLI273 - Warner281 - Finch325 - McCullum335 - Malik414 - Pollard#IPL2020 #RCBvsDC— Bharath Seervi (@SeerviBharath) October 5, 2020 जाणून घ्या विराटच्या विक्रमी खेळीबद्दल आणखी काही महत्वाची आकडेवारी. Players to reach 9000 T20 runs - in chronological order:Gayle -May 2016McCullum - April 2018Pollard - March 2019Malik - October 2019Warner - November 2019Finch - September 2020KOHLI - October 2020 #IPL2020 #RCBvsDC— Bharath Seervi (@SeerviBharath) October 5, 2020 Average & SR at 9000 T20 runs (end of match):42.16 & 150.14 - Gayle41.05* & 134.25*- KOHLI37.58 & 142.33 - Warner37.40 & 125.15 - Malik36.14 & 143.63 - Finch30.94 & 137.81 - McCullum30.00 & 150.47 - Pollard#IPL2020 #RCBvsDC— Bharath Seervi (@SeerviBharath) October 5, 2020 उर्वरित फलंदाज एकामागोमाग एक बाद होत असताना विराटने एक बाजू लावून धरत दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. अखेरीस कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर विराटही यष्टीरक्षक पंतकडे झेल माघारी परतला.