दहावी आणि बारावी या दोन महत्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन झाले. शुक्रवारी १९ जून रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच यावेळेत टीप-टॉप प्लाझा येथे पुन्हा ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ मार्गदर्शन सत्र होणार असून त्यातही मोठय़ा संख्येने विद्यार्थी सहभागी होणार आहेत.