विद्यापीठाचे आरोग्य केंद्र, विद्यार्थिनींची असुरक्षितता, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि क्रीडा संकुलातील असुविधा हे प्रश्न तडीस लावण्यासाठी मनविसेने मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंना रस्त्यातच घेरले. एका महिन्यात या प्रश्नांवर निर्णय घेण्याचे आश्वासन या वेळी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी दिल़े  
मनविसेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली कलिना येथील विद्यापीठाच्या संकुलात हे आंदोलन करण्यात आले. या प्रश्नांबाबत विद्यापीठाला वारंवार निवेदने देऊन आम्ही कंटाळलो आहोत. त्यामुळे, नाईलाजाने आम्हाला प्र-कुलगुरूंना घेराव घालावा लागला, असे तांबोळी यांनी सांगितले. विद्यापीठाने आवश्यक सुधारणा न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही तांबोळी यांनी दिला आह़े