नोटाबंदीमुळे व्यवहार ठप्प झाल्याची तक्रार

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबदलाचा फटका राज्यातील सहकारी बँकांना मोठय़ा प्रमाणात बसत आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सहकारी बँकांचे सुमारे वीस हजार कर्मचारी, संचालक आणि ठेवीदार रिझव्‍‌र्ह बँकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती येथे जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या वतीने देण्यात आली.

kerala moves supreme court against dispute over states borrowing powers
लेख : राज्यांच्या कर्जमर्यादेला केंद्राचा चाप?
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Krishi Integrated Command and Control Centre
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केला डिजिटल डॅशबोर्ड; बळीराजाला कसा फायदा होणार?

केंद्र सरकारने ८ तारखेला घेतलेल्या नोटाबदलाच्या निर्णयामुळे नागरिकांना नागरी सहकारी बँकेत पसे भरण्यासाठी व काढण्यासाठी त्रास होऊ लागला आहे. केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे या बँकांतील कर्मचाऱ्यांना, नागरिकांना मोठय़ा प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो. बँकांमध्ये नोटा मिळणे असह्य झाल्यामुळे बँकांचे व्यवहार ठप्प झाले असून, ग्राहकांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सहकारी बँकांचे वीस ते बावीस हजार कर्मचारी रिझव्‍‌र्ह बँकेवर मोर्चा काढण्याचा तयारीत आहेत. हा निर्णय इचलकरंजी येथे झालेल्या नागरी सहकारी बँकेच्या बठकीत घेण्यात आला. नागरी सहकारी बँक फेडरेड व कर्नाड बँक रीसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने सहकारी बँकेच्या झालेल्या आíथक कोंडीबाबत आज चर्चा झाली.

या बाबतची माहिती कर्नाड बँक रीसर्च फाऊंडेशनचे प्रमुख किरण कर्नाड यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, नागरी सहकारी बँकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरी बँकांची अवस्था एकदम हलाखीची झाली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून नागरी बँकांना नवीन चाळणी नोटा गेल्या दहा दिवसांपासून पुरवठा केला जात नाही, त्यामुळे या बँकेचे कर्मचारी व ठेवीदारांचे हाल होऊ लागले आहेत. शेडय़ूल्ड बँकेकडून सहकार्य होत नसल्यामुळे नागरी बँकांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयाविरोधात राज्यातील सहकारी बँकांचे वीस ते बावीस हजार कर्मचारी, संचालक आणि ठेवीदार रिझव्‍‌र्ह बँकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. या प्रश्नी नागरी बँकांचे प्रतिनिधी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. यातून मार्ग निघेल असा नागरी बँकांना विश्वास आहे, पण तो न निघाल्यास मोर्चा काढणे अपरिहार्य आहे.

[jwplayer zkvFlBpu-1o30kmL6]