राज्यातील रखडलेली ८ हजार पोलिसांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे सांगितले. या भरतीसाठीचे नियोजन सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

टाळेबंदीतील निर्बंध शासनाकडून शिथील केले जात असले तरी जिल्ह्य़ांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही. याबाबत कडक उपाय योजना राबविण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिल्या.

करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरण वाढविणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.