माजी खासदार,माजी उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी ९० व्या वर्षी करोनावर मात केली. आज त्यांचे रुग्णालयातून इचलकरंजीतील निवास्थानी कुटुंबीयांनी उत्साहात स्वागत केले.यावेळी फुलांच्या पायघड्या अंथरल्या आल्या होत्या. फुलांचा वर्षाव करून आवाडे कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर त्याचा संसर्ग आवाडे परिवाराला बसला. माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे,त्यांचे सुपुत्र स्वप्नील आवाडे,जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जवाहर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणीच्या माजी अध्यक्ष सपना आवाडे यांच्यासह कुटुंबातील बहुतेक सर्व सदस्यांना तसेच घर व कार्यालयातील काही कर्मचारी वर्ग यांना बाधा झाली होती.

udayanraje bhosale, nomination, satara lok sabha 2024 election
मला उमेदवारी मिळणार हे निश्चित – उदयनराजे
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Chandrakant Patil instructs angry workers to leave the hall in maval
महायुतीच्या मेळाव्यात ‘मानापमान’ नाटय़; चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नाराज’ कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनाही लागण झाली होती. आवाडे कुटुंबातील बहुतेक सदस्य इचलकरंजी येथील अलायन्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. कल्लाप्पांना आवाडे व प्रकाश आवडे हे दोघेही एकाच वेळी तेथे उपचार घेत होते. प्रकाश आवाडे हे चार दिवसापूर्वी करोनावर मात करून घरी परतले होते.तर आज कल्लाप्पाण्णा आवाडे यांना रुग्णालयातून बरे झाल्याने निरोप देण्यात आला.
इचलकरंजीतील इंदू कला या निवासस्थानी कल्लाप्पांना आवाडे यांचे कुटुंबयांनी उत्साहात स्वागत केले. ते घरी परतत असल्याच्या आनंदा प्रित्यर्थ फुलांच्या पायघड्या अंथरंगात आल्या होत्या. परिवारातील महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.त्यांना कुंकुमतिलक लावण्यात आला. प्रकाश आवाडे, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन कल्लाप्पांना आवाडे यांचे स्वागत केले. आवाडे कुटुंबातील सर्व सदस्य करोना मुक्त झाल्याचा आनंद आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. इचलकरंजी शहर करोनामुक्त व्हावे यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.