सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

कोल्हापूर शहरातील वादग्रस्त बनलेल्या आणि राजकीय लढय़ास कारणीभूत ठरलेल्या तावडे हॉटेल  परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवण्याला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही  अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आदेश मागील आठवडय़ात उच्च न्यायालयाने दिले होते. या बाबत उचगाव ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता हा आदेश देण्यात आला.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Mumbai Municipal Corporation, Issues Notices for Tree Trimming, Prevent Monsoon Accidents, housing societies, bmc sent notice to housing societies,
खासगी भूखंडावरील वृक्ष छाटणीसाठी सोसायट्यांना नोटीस, प्रति झाड ८०० रुपये ते चार हजार रुपये शुल्क
Nashik, Leopard caught
नाशिक : पाथर्डी परिसरात बिबट्या जेरबंद
Seawoods construction blast
सीवूड्समध्ये बांधकाम प्रकल्पातील नियंत्रित स्फोट बंद करण्याची पालिकेची सूचना, अन्यत्र ठिकाणी मात्र दुर्लक्ष

कोल्हापूर महापालिकेने तावडे हॉटेल परिसरातील शेकडो एकर जमिनींवर अनधिकृत बांधकामे वादाला कारण ठरले आहे. कोल्हापूर महापालिका आणि उचगाव ग्रामपंचायतीने सदरचा भूखंड आपल्या हद्दीत येत असल्याचा दावा केला आहे. महापालिकेने या जागेवर हक्क सांगत आरक्षण टाकले आहे. या आरक्षित जागेवर बडय़ा व्यापाऱ्यांनी राजकीय वरदहस्तामुळे आलिशान इमारती, व्यापारी संकुले उभारली आहेत. या इमारती उभारत असताना बांधकामांसाठी उचगाव ग्रामपंचायतीने ना हरकत दाखले दिले होते.

यावरून वाद ताणाला असताना मुंबई उच्च न्यायालयाने तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामे करण्यात आलेल्या जागा महापालिकेच्याच हद्दीमध्ये असल्याचा निर्णय २२ फेब्रुवारी रोजी दिला होता. दुसरीकडे राज्य सरकारने ही बांधकामे पाडण्यास स्थगिती दिल्याचा मुद्दा पुढे करत महापालिका प्रशासनाने हलगर्जीपणा सुरू ठेवला होता.  मात्र मुंबई  उच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतर राज्य सरकारने  आपला आदेश मागे घेतला. दरम्यान, उचगाव ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित बांधकामांवर कारवाई करण्याबाबत स्थगिती दिली आहे. आता हे प्रकरण पुढे कसे वळण घेणार याचे कुतूहल निर्माण झाले आहे.