कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग दिलीप अकोलकर आणि विनय बाबूराव पवार यांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करावे, असा प्रस्ताव तपास यंत्रणेने राज्य शासनाला पाठवला होता. गृहविभागाने हा प्रस्ताव मंजूर केला असून, फरारी आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृहविभागाने बुधवारी पारित केला. संशयित आरोपी सारंग दिलीप अकोलकर हा पुण्याचा असून, विनय पवार हा कराडजवळील उंब्रजचा रहिवासी आहे.
यापूर्वी पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड आणि सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक झाली होती.

पानसरे हत्या प्रकरणी संशयित विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्यास राज्य सरकारने १० लाखांचे बक्षीस जाहीर केले. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली. पानसरे यांच्यावर फेब्रुवारी २०१५ मध्ये हल्ला झाला होता. या प्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे यांच्यासह विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यावर विशेष तपास यंत्रणेने दोषारोप दाखल केले आहेत. यापैकी वीरेंद्र तावडे दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे, तर समीर गायकवडला नुकताच जमीन मंजूर झाला आहे. विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्याबाबत कोल्हापूर सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात अटक वारंट जारी करूनही ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अखेर बक्षीस जाहीर करण्यात आले.