जयपूर-अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ  शास्त्रीय गायिका, शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाटय़शास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. भारती वैशंपायन यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६६ वर्षांंच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती अविनाश वैशंपायन, मुलगा केदार, मुली मीरा आणि मधुरा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. घरंदाज गायकीमधून प्रकटलेला त्यांचा प्रत्येक स्वर रसिकांच्या मनाची पकड  घेत असे.

सांगीतिक वारसा असणाऱ्या कुटुंबात १ जानेवारी १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला . वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच त्यांच्या हिंदुस्थानी संगीताच्या शिक्षणास सुरुवात झाली. एसएनडीटी विद्यापीठातून वैशंपायन यांनी संगीतात एम.ए. चे शिक्षण घेतले.  १९८५ मध्ये गंधर्व महाविद्यालयाने त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका म्हणून त्यांनी देशभरात मैफिली गाजवल्या. हिंदुस्थानी रागांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. दुर्मिळ आणि प्राचीन रागांवर मैफिली करत त्यांनी त्याचे संवर्धन करीत हा वारसा पुढील पिढीकडे सोपवला.

kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
caribbean writer maryse conde profile author maryse conde information zws
व्यक्तिवेध : मारिस कॉण्डे
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

आकाशवाणीसाठी गायन, मराठी संगीत नाटक यात त्या सक्रिय असत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘संगीत स्वयंवर’ने दिल्ली येथील ब्रुहनमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था येथे सर्वोत्कृष्ट नाटकसाठी प्रथम क्रमांक मिळवला होता. शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाटय़शास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या. गतवर्षी त्यांना डॉ. त्र्यंबकराव जानोरीकर संगीतभूषण पुरस्कार देण्यात आला होता. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईतर्फे त्यांना ‘गानहिरा’ ही पदवी मिळाली आहे. पंचगंगा स्मशानभूमी येथे सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.