scorecardresearch

कोल्हापूर : बेडगचा प्रश्न पुन्हा तापला; आंबेडकरी समाजाच्या मुंबई पदयात्रेस माणगावातून सुरुवात 

बेडग ग्रामस्थांनी गावात कोणत्याही महापुरुषांच्या नावे कमान उभी करायचे नाही, असा ठराव केल्याने पुन्हा मतभेद सुरू झाले.

ambedkar followers started march from mangaon to mumbai mantralaya
तेलंगण विभागाचे प्रभारी प्रभारी विनोद निकाळजे, अध्यक्ष अमर कांबळे, नंदकुमार शिंगे आदी उपस्थित होते. एक हजारावर महिला, पुरुषांनी माणगाव येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले.

बेडग गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभी राहत नाही; तोपर्यंत गावात परतणार नाही, असा निर्धार करीत तेथील  आंबेडकरी समाज बांधवांनी मंगळवारी माणगाव (ता.हातकनंगले)  येथून मुंबई मंत्रालयापर्यंत पदयात्रेस सुरुवात केली.

बेडग (ता. मिरज) या गावातील कमानीचा गेले तीन महिने वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातर्फे कमान बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बेडग ग्रामस्थांनी गावात कोणत्याही महापुरुषांच्या नावे कमान उभी करायचे नाही, असा ठराव केल्याने पुन्हा मतभेद सुरू झाले.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

हेही वाचा >>> कोल्हापूरातील भाजप अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; कार्यालयाला टाळे ठोकले

लाँग मार्चला प्रतिसाद

त्यावर आता, कमान उभी करण्याच्या मागणीसाठी बेडग मधील आंबेडकरी समाज बांधवांनी आज लाँग मार्च – पदयात्रेला सुरुवात केली.राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक माणगाव परिषद झाली होती. त्यामुळे या गावातून बेडग मधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मुंबईच्या दिशेने पदयात्रेला कूच केली असता त्यामध्ये तरुण तरुणी, महिला,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तर परिणाम भोगावे लागतील…

यावेळी माजी आमदार राजीव आवळे,माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी आंबेडकर समाजाची मागणी सरकारने मान्य केली नाही तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. आठवले गटाचे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी शासनाने सत्वर कमान उभी करावी; कायदेशीर बाब निर्माण झाल्यास शासन जबाबदार राहील, असा इशारा दिला. तेलंगण विभागाचे प्रभारी प्रभारी विनोद निकाळजे, अध्यक्ष अमर कांबळे, नंदकुमार शिंगे आदी उपस्थित होते. एक हजारावर महिला, पुरुषांनी माणगाव येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले. सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार यांनी पदयात्रेस पाठिंबा जाहीर केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-09-2023 at 18:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×