scorecardresearch

Premium

पानसरे यांच्या जन्मदिनी कोल्हापुरात संघर्ष यात्रा

सर्वसामान्यांच्या मनात पोलीस यंत्रणा व तपासाविषयी प्रश्नचिन्ह

पानसरे यांच्या जन्मदिनी कोल्हापुरात संघर्ष यात्रा

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांची २४ नोव्हेंबर रोजी जयंती संघर्ष यात्रा व निर्धार सभा होणार आहे. या दिवशी राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल होणार असून, सागरमाळ येथील पानसरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ जमून निर्धार शपथ घेणार आहेत, तसेच पानसरे यांच्या घरासमोर निर्धार व्यक्त करणार असल्याची माहिती भाकपचे नामदेव गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गावडे म्हणाले, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे पाठोपाठ खून झाले तरी मारेकरी अद्याप सापडत नाहीत. तीन खुनानंतरही पुरोगामी कार्यकर्त्यांना धमकीची पत्रे येत आहेत. सनातनचा साधक समीर गायकवाड याच्या विरुद्ध अद्यापही दोषारोपपत्र दाखल झाले नाही. चौकशीही अद्याप पूर्ण होत नाही, यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलीस यंत्रणा व तपासाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे खूनसत्र थांबावे, सनातन संस्थेवर कारवाई करावी, या मागणीसाठी पानसरे यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांचे दोन जथ्थे कोल्हापुरात येणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी पुण्याहून संघर्ष यात्रा निघणार आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर, भालचंद्र कानगो, अशोक ढवळे, भारत पाटणकर, मिलिंद रानडे सहभागी असणार आहेत. तर दुसरा जथ्था ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली पानसरे यांच्या जन्मभूमी कोल्हार (जि. अहमदनगर) येथून निघून तो कोल्हापुरात येणार आहे. सकाळी दोनही जथ्थे कावळा नाका येथे जमून त्यानंतर सागरमाळ येथील पानसरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ पोहोचणार आहेत. यानंतर ते निर्धार शपथ घेऊन मिरवणुकीद्वारे दसरा चौक येथे पोहोचणार आहेत. या ठिकाणी दुपारी १२ वाजता सभेला सुरुवात होणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाकपचे दिलीप पवार, एस. बी. पाटील, दिनकर सूर्यवंशी, चंद्रकांत यादव, अंधश्रद्धा निर्मूलनच्या सुनील स्वामी, सुजाता म्हेत्रे आदी उपस्थित होते.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
ajit pawar and devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Conflict march for pansares anniversary in kolhapur

First published on: 19-11-2015 at 03:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×