कोल्हापूर : पंचगंगा नदीतील तेरवाड बंधाऱ्यापाठोपाठ आता शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे. कारखान्यातून सोडण्यात आलेल्या रसायन मिश्रित काळय़ा पाण्यामुळे ही घटना घडली असल्याचे सोमवारी सांगण्यात आले.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ झाल्याने नदीपत्रात मृत माशांचा खच साचत असल्याचे विदारक दृश्य सतत दिसत आहे. वळिवडे – गांधीनगर, रुई बंधारा , टेरवड बंधारा येथे हा प्रकार उघडकीस आला. तर आता शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे.औद्योगिक वसाहतीतून रसायन मिश्रित पाण्यावर प्रक्रिया करण्याऐवजी थेट काळे पाणी नदीत सोडत असल्यामुळे नदीचे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत आहे. नदीतील पाणी फेसाळलेले दिसत आहे. मासे मृत होऊन नदीकाठी तरंगत आहेत. हे मृत मासे नदीतून बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

उपद्रव वाढला
दूषित पाण्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. शेतीलाही फटका बसत आहे. माशांची पैदासच नष्ट होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने रसायनयुक्त प्रदूषित पाण्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नदीकाठावरील ग्रामस्थांतून होत आहे.