धर्माच्या नावावर देशात विद्वेष ,हिंसा पसरवली जात आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी कोल्हापुरात केली.भारत जोडो यात्रा राज्यात येत आहे, त्याच पहिला मेळावा कोल्हापूर येथे झाला त्यावेळी ते बोलत होते.

भारताचे संविधान धोक्यात आहे.यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. यामध्ये जोडले गेलो तर कोणी आपल्याला दूर करू शकत नाही. देश म्हणून आपण एक आहोत. ते द्वेष पसरवत आहेत. आम्ही देश जोडत आहे. काहीही झाले तरी भारत जोडो यात्रा कोणीही रोखू शकत नाही. भाजप-आरएसएसने पसरवलेला द्वेष आणि हिंसाचार थांबवणे हा आमच्या यात्रेचा उद्देश आहे. त्याला आतापर्यंत जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. देशात बदलत चाललेले वातावरण निर्माण होत आहे, असेही ते म्हणाले.

when bjp leader ashish shelar accidently said Sunetra Pawars defeat in Baramati know what happen exactly
Video: …अन् आशिष शेलार म्हणाले, “सुनेत्रा पवारांचा पराभव होणार!”
Laxman Hake, Mahavikas Aghadi,
माढ्यात महाविकास आघाडीविरुद्ध प्रा. लक्ष्मण हाके यांची बंडखोरी, महात्मा फुलेंच्या वेशभूषेत भरली उमेदवारी
Srikala Reddy Singh and her husband Dhananjay Singh
नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत हे मशिदीत जात आहेत. संघाचे लोक महागाई, बेरोजगारी वाढत आहे असे सांगत आहेत. हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे. यात्रेत सहभागी होता आले नाही तर गल्ली ,गावात तिरंगा झेंडा घेऊन यात्रा काढा, असे आवाहन त्यांनी केले.