कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. तीन दिवसानंतर पुन्हा पाऊस पडल्याने नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला. जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाळी वातावरण आहे. पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली होती. दुपारी शिवाजी विद्यापीठ, शाहू टोल नाका, राष्ट्रीय महामार्ग, लोणार वसाहत आदी भागात मुसळधार पाऊस झाला. जोरदार वारे सुटले होते. सुमारे तासाहून अधिक काळ पाऊस पडत होता. जिल्ह्याच्या अन्य भागातही पाऊस झाला. कोल्हापूर शहरात मात्र पावसाळी वातावरण होते.