कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कालावधीत सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्न दाखवली. पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडला. मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काँग्रेसने त्यांना नऊ प्रश्न विचारले असून त्यातील एकाही प्रश्नाचे उत्तर देण्याची त्यांची हिम्मत होत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, प्रदेश सचिव शशांक बावचकर, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.

 मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला आवर घालण्यात ते अपयशी ठरले आहेत. उलट कर्नाटकामध्ये उलट भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये ४० टक्के पर्यंत भ्रष्टाचार वाढला होता. त्यामुद्द्या वरून सामान्य जनतेने भाजप सरकारला धडा शिकवून सत्ताबदल केला. कर्नाटकच्या विजयामुळे विरोधी पक्षांना शक्ती मिळाली आहे. २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये भाजपला ३१ टक्के तर गेल्या वेळी ३७ टक्के मते मिळाली होती. याचा अर्थ देशातील अजूनही ६५ टक्के जनता भाजपच्या विरोधात आहे.

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!
janardhan reddy return to bjp
खाण घोटाळाप्रकरणी नऊ गुन्हे दाखल असलेल्या माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश; यामागचं राजकारण काय?

ती एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना आता गती आली असल्याने केंद्र सरकार घाबरले आहे, असेही चव्हाण म्हणाले. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. विरोधकांनी आवाज उठवला तर ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्याची भीती दाखवली जाते. जयंत पाटील यांची आता अशीच चौकशी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.  ही अपयशाची नऊ वर्ष आहेत. त्यामुळे देशीतील जनता आता त्यांना योग्य ते उत्तर देईल, असेही ते म्हणाले.