लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : सध्या काम सुरू असलेल्या रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी चोकाक या गावच्या पुढे हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांच्या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींना चौपट मोबदला दिल्याशिवाय या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे.

no action taken against project officer shubham gupta guilty in cow allocation scam
गायवाटप घोटाळ्यात दोषी आयएएस अधिकारी गुप्ता यांच्यावर कारवाई केव्हा? प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईवर…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
raigad collector recommended increasing compensation for farmers affected by virar alibag aorridor
शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची शासनाला शिफारस, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
Information about impact of union budget 2025 on agriculture in marathi
विश्लेषण : कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?
road lines of Shilpata road blocked
शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांचा ३०७ कोटीचा मोबदला रखडवला
BMC budget 2025 news in marathi
पालिकेच्या अर्थसंकल्पाला मालमत्ता कराचा हात; १२५० कोटींनी उद्दिष्ट वाढले; ७५ टक्के मालमत्ता कर वसूल
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी

राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या रत्नागिरी पासून हातकणंगले तालुक्यातील चोकाकपर्यंतचे काम वेगाने पूर्ण करत आणले आहे. या पुढे चोकाकपासून अंकलीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग बनविताना हातकणंगले तालुक्यातील काही गावांसह तमदलगेपासून अंकलीपर्यंतच्या मार्गात मोठ्या प्रमाणात बागायती शेतीचे संपादन करावे लागणार आहे.

आणखी वाचा-C P Radhakrishnan : “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझं नाव वेगळं असतं”, सी.पी.राधाकृष्णन यांचं विधान

केंद्र सरकारने हा राष्ट्रीय महामार्ग बनवताना रत्नागिरी ते चोकाकपर्यंतच्या महामार्गावरील संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींना चौपट मोबदला दिला आहे. पण या पुढच्या शेतकऱ्यांना केवळ दुप्पट मोबदला दिला जाईल, असे धोरण अवलंबले आहे. याला शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याने संबंधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिल्याखेरीज या रस्त्याचे काम करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Story img Loader