कोल्हापूर : राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये एसटीच्या महिलांच्या तिकीट आकारणीमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वडाप चालक चिंतेत पडले आहे. त्यांचा व्यवसाय निम्म्याने घटणार असून नवे प्रवासी मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

  राज्य शासनाच्या या निर्णयाचा मोठा परिणाम खाजगी वाहतूक करणाऱ्या तसेच शेअरिंग वाहतूक करणाऱ्या वडापचालकांवर होणार आहे. जिल्हात राधानगरी शाहूवाडी, भुदरगड तालुका तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम  , दक्षिण भागामध्ये खाजगी जीप, रिक्षा याद्वारे वडाप वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
crisis on sugar industry 3000 crore hit due to restrictions on ethanol production
साखर उद्योगावर संकट; इथेनॉलनिर्मितीवरील निर्बंधांमुळे तीन हजार कोटींचा फटका
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

  एसटी व वडाप तिकीट एक सारखेच आहे. आता एसटीमध्ये ५० टक्के सवलत मिळत असल्याने महिला लालपरीचा आधार घेणार आहेत. परिणाम वडाप चालकांचा ग्राहकांचा मोठा आधार तुटला असल्याने त्यांना चिंता लागून राहिली आहे.

महिलांकडून स्वागत

 एसटीच्या तिकीट आकाराने ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. राज्य परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्यामध्ये महिलांची संख्या सुमारे ४० टक्केहून अधिक आहे. यामुळे या निर्णयाचा लाभ नोकरी व्यवसाय, व्यापार या निमित्ताने प्रवास करणाऱ्या महिलांना होणार आहे.

 एसटीच्या प्रवासामध्ये निम्मी सवलत दिल्यामुळे महिला बचत गटांना मोठा आधार मिळाला आहे. बचत गटाच्या कामासाठी, वस्तू विक्रीसाठी नेहमी प्रवास करावा लागतो. आता हा प्रवास कमी खर्चात होणार असल्याने या निर्णयाचा महिलांना नक्कीच लाभ होईल, असे शहापूर येथील वीरता बचत गटाच्या अध्यक्षा शालन खोत यांनी सांगितले.

 नोकरीच्या निमित्ताने शासकीय, निमशासकीय, खाजगी सेवेतील महिला एसटीने प्रवास करीत असतात. शासनच्या निर्णयामुळे महिलाच्या प्रवास खर्चात मोठी बचत होणार आहे. ही बचत घर कामासाठी तसेच गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे, असे स्वप्नाली माडकर यांनी सांगितले.