भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. बुधवारी विंडीजविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी कसोटी संघातील खेळाडूंनी बुधवारी विंडीजला प्रयाण केलं. दौऱ्यावर निघण्याआधी अजिंक्यने आपली भावाची जबाबदारी पार पाडत, रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतानाचे फोटो अजिंक्यने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. २२ ऑगस्टपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. कसोटी क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखण्यासाठी भारताला या मालिकेत विजय मिळवणं गरजेचं आहे.