ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केलं. या विजयाबद्दल बोलताना अजिंक्यने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

ऋषभ पंतने ‘करून दाखवलं’; टीकाकारांना बॅटनं दिलं चोख उत्तर

“आजचा हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा विजय शब्दात कसा वर्णन करावा हे मला माहिती नाही. आमच्या संघातील साऱ्या खेळाडूंचा मला अभिमान आहे. आम्हाला आमच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची होती. मी जेव्हा फलंदाजीसाठी उतरलो तेव्हाच आम्हीच ठरवलं की जिंकण्यासाठी खेळायचं. मग मी माझ्या पद्धतीने खेळलो, कारण आमच्याकडे ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल हे दोघे शिल्लक होते. पुजाराला तर या विजयाचे श्रेय दिलेच पाहिजे. त्याने दडपणाचा चांगला सामना केला आणि त्यानंतर पंतने तर सामन्याचा शेवट अगदी उत्तम केला”, असं अजिंक्य म्हणाला.

MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा
Virat Kohli
सातत्यपूर्ण कामगिरीचा बंगळूरु, कोलकाताचा प्रयत्न; ‘आयपीएल’मध्ये आज आमनेसामने

Videos: चेतेश्वर पुजारा The Wall- कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुरून उरणारा भारतीय!

“आमच्यासमोर मुख्य मुद्दा होता तो म्हणजे २० बळी मिळवण्याचा. आम्ही पाच गोलंदाजांसह खेळत होतो आणि त्यामुळे आम्हाला त्यांचा योग्य फायदा मिळाला. वॉशिंग्टन सुंदरमुळे आमच्या संघात समतोल कायम राहिला. सिराजने केवळ दोन सामने खेळले होते, सैनी आणि शार्दुलने एकमेव सामना खेळला होता. नटराजन तर नवखाच होता. पण पहिल्या सामन्यात काय घडलं याची आम्ही अजिबात चर्चा केली नाही. आम्ही केवळ मैदानात जाऊन खेळावर लक्ष दिलं. खेळपट्टीवर आम्ही सर्वस्व पणाला लावलं. त्यामुळे हा सांघिक कामगिरीचा विजय ठरला”, असं अजिंक्यने सांगितलं.

शुबमन गिलचा धमाका! मोडला सुनील गावसकरांचा ५० वर्ष जुना विक्रम

आपल्या शंभर कसोटी पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याचंही त्याने अभिनंदन केलं.