अक्षर पटेलने आपल्या अष्टपैलू कामगिरीची चुणूक दाखवताना नाबाद ६९ धावा (१० चौकार आणि २ षटकार) केल्या. त्यामुळे भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध ८ बाद ४१७ धावा करताना १५७ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या आणि अखेरच्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे पावसामुळे मात्र बरेच नुकसान झाले. गुरुवारी झालेल्या २२ षटकांच्या खेळात ७५ धावा भारत ‘अ’ संघाने केल्या.