आयपीएलच्या बाराव्या हंगामातील सामन्यांच्या वेळांबद्दलचा संभ्रम अखेरीस संपुष्टात आलेला आहे. 23 मार्चपासून सुरु होणारे आयपीएलचे सर्व सामने रात्री 8 वाजता सुरु होणार असल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिलं. संध्याकाळचे सामने 4 वाजता तर रात्रीचे सामने 8 वाजता सुरु होतील.

अवश्य वाचा – आयपीएलदरम्यान थकवा जाणवल्यास जरुर विश्रांती घेईन – भुवनेश्वर कुमार

मधल्या काही दिवसांमध्ये बीसीसीआय सामन्यांची वेळ 7 वाजता करणार असल्याची चर्चा होती. अकराव्या हंगामाच्या उत्तरार्धातही बीसीसीआयने काही सामन्यांची वेळ संध्याकाळी 7 वाजता ठेवली होती. मात्र काही संघमालकांचा या निर्णयाला विरोध होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी सामन्यांची वेळ रात्री 8 वाजताचीच ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.