तुर्कीतल्या अंटालया शहरात सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिलांनी पहिल्या सांघिक पदकाची कमाई केली आहे. ज्योथी सुरेखा वेन्नम, मुस्कान किरर आणि दिव्या धयाल या जोडीला शुक्रवारी रौप्यपदक मिळालं आहे. अंतिम फेरीत भारतीय महिलांना चीन तैपेईच्या महिलांकडून पराभव स्विकारावा लागला, पहिल्या २ फेऱ्या गमावल्यामुळे पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिलांनी तिसऱ्या व चौथ्या फेरीत दमदार पुनरागमन केलं. मात्र अखेरच्या फेरीत चीन तैपेईच्या महिलांनी पुन्हा एकदा बाजी मारत भारतीय महिलांना धोबीपछाड दिला. २३१-२२८ अशा फरकाने भारतीय महीलांना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.