रोइंग म्हणजेच नौकानयन स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळवर आज शेती करण्याची वेळ आली आहे. हे वाचायला विचित्र वाटत असले तरी हे कटू सत्य आहे. २०२०मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त भोकनळने आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर त्याने फेडरेशनविरूद्ध भेदभावाचे गंभीर आरोप केले. महाराष्ट्रीय असल्याने माझ्यावर अन्याय झाला, असे दत्तूने सांगितले.

दत्तू म्हणाला, ”माझ्यापेक्षा जास्त वेळ घेणाऱ्या खेळाडूंना संधी दिली गेली. मला पात्रता फेरीत भाग घेण्याची परवानगीदेखील नव्हती, पण कोणतेही कारण न सांगता मला शिबिरातून काढून टाकण्यात आले.” २०१७मध्ये दत्तुला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
PM Modi receives the Order of the Druk Gyalpo by Bhutan King Jigme Khesar
पंतप्रधान मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित; पहिल्यांदाच घेतला ‘हा’ वेगळा निर्णय!

 

 

हेही वाचा – आयर्लंडला दणका देत क्विंटन डी कॉकनं मोडला धोनीचा विक्रम!

दत्तू भोकनळची कामगिरी

दत्तुला पात्रता फेरीत स्थान मिळवता आले नाही आणि काही दिवसांपूर्वीच त्याने सैन्यात नायब सुभेदार पदाचा राजीनामाही दिला आहे. २०१४ मध्ये दत्तूने राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदके जिंकली होती. २०१५मध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये दत्तूने रौप्य पदक आणि त्यानंतरच्या वर्षी चीनमध्ये झालेल्या १६व्या आशियाई रोइंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या कामगिरीच्या जोरावर त्याला २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. भारताकडून रोइंग स्पर्धेत खेळणारा तो एकमेव खेळाडू होता.