भारतीय बॉक्सर्सनी अप्रतिम खेळ करत आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. त्यामुळे भारताची १२ पदके निश्चित झाली आहेत.

सतेंदर सिंगने (९१ किलो) कोरियाच्या हॅन्यूल जंगचा पराभव केला. त्याचबरोबर सिलाय सॉय (४९ किलो) याने तैवानच्या झू-चेन याला हरवले. महिलांमध्ये पूनम (५४ किलो) आणि अरुंधती चौधरी (६९ किलो) यांनी आगेकूच केली. पूनमने फिलिपिन्सच्या कॅरानागेन काये हिचा तर अरुंधतीने तैवानच्या पिन-जू चेन हिचा पाडाव केला. पुरुषांच्या गटात, अक्षय कुमार (६४ किलो) याचे आव्हान संपुष्टात आले.