आसामचा क्रिकेटपटू अर्पण दत्ताने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात १० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नरुद्दीन अहमद चषक स्पर्धेत अर्पणने शिवसागर संघाकडून खेळत असताना अर्पणने Charaideo संघाविरुद्ध ही कामगिरी केली. अर्पणने १९ षटकं टाकून ४८ धावांच्या बदल्यात संपूर्ण संघ माघारी धाडला.

अर्पणच्या गोलंदाजीच्या जोरावर शिवसागर संघाने Charaideo संघाचा डाव १२१ धावांमध्ये संपवला. हा सामना अनिर्णित राहिला असला तरीही शिवसागर संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महत्वाचे गुण मिळवले आहेत. अर्पणला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.