फिल ह्य़ुजेसला विजयी श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आतुर असेल आणि त्यामुळे निर्धाराने ही मालिका जिंकण्याचा ते प्रयत्न करतील. त्यामुळे भारतासाठी ही मालिका खडतर असेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने व्यक्त केले आहे.
‘‘आपल्या दिवंगत मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. हे भारतीय संघालाही चांगलेच माहिती असेल, पण तरीही ऑस्ट्रेलियाचा संघ ज्या पद्धतीने मैदानात उतरेल ते पाहणे उत्सुकतेचे असेल. या परिस्थितीतून ऑस्ट्रेलियाचा संघ कशा पद्धतीने बाहेर पडतो, हे पाहावे लागेल. पण त्यांचे ध्येय हे विजयानिशी ह्य़ुजेसला श्रद्धांजली वाहणे हेच असेल,’’ असे अक्रम म्हणाला.