भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधली कोणतीही क्रिकेट मालिका ही वादांशिवाय पूर्ण होत नाही. सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनतरही विराट कोहली आणि टीम पेन यांच्यात झालेल्या वादामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटलं. अनेक माजी खेळाडूंनी विराटच्या आक्रमक स्वभावावर टीका केली. कोहली आणि पेन यांच्यात झालेल्या तू-तू, मै-मै नंतर एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने, भारतातील एका स्थानिक क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ पोस्ट करत विराटची खिल्ली उडवली.

मात्र ऑस्ट्रेलियन पत्रकाराला विराटची खिल्ली उडवणं नंतर चांगलंच महागात पडलं. नेटीझन्सनी विराटची टर उडवणाऱ्या पत्रकाराला स्टिव्ह स्मिथच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाची आठवण करुन देत गप्प केलं.