बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने आगामी भारत दौऱ्यासाठी बांगलादेशच्या टी-२० संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी भारताविरुद्ध मालिकेत संघामध्ये पुनरागमन केलं आहे. ३ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून पहिला टी-२० सामना दिल्लीत खेळवला जाणार आहे.

टी-२० मालिकेसाठी असा असेल बांगलादेशचा संघ –

शाकीब अल हसन (कर्णधार), तमिम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, मुश्फिकुर रहिम, महमद्दुला, मोहम्मद नईम, मोसादक हुसैन, अफिफ हुसैन, अराफत सनी, मोहम्मद सैफुद्दीन, अमिनुल इस्लाम, अल-अमिन हुसैन, मुस्तफिजूर रेहमान, शफीउल इस्लाम