भार्गव भटचा भेदक मारा तसेच सलामीवीर आदित्य वाघमोडे आणि दीपक हुडा यांच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याने महाराष्ट्रावर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राचा डाव १७६ धावांवर संपुष्टात आणला. राहुल त्रिपाठीने पाच चौकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली.
बडोद्याच्या वाघमोडे आणि हुडा यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. वाघमोडेने या वेळी ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची खेळी साकारली, तर हुडाने ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५८ धावांची खेळी करत वाघमोडेला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ५० षटकांत ९ बाद १७६ (राहुल त्रिपाठी ४६; भार्गव भट ४/३०) पराभूत वि. बडोदा : ३९.३ षटकांत २ बाद १७७ (आदित्य वाघमोडे नाबाद ७७, दीपक हुडा नाबाद ५८; डॉमिनिक मुथ्थुस्वामी १/३०).