अल्पावधीत जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या IPL स्पर्धेच्या आराखड्यात बीसीसीआय महत्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या ८ संघांमध्ये खेळवण्यात येणारी ही स्पर्धा पुढील हंगामात ९ संघांनिशी खेळवली जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासाठी हालचालीही सुरु केल्याचं समजतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ICC चा Future Tour Program (FTP) आणि BCCI मध्ये झालेल्या चर्चेनुसार आयपीएलमधील सामन्यांची संख्या ही ७६ असावी असं ठरलं होतं. मात्र नवव्या संघाला प्रवेश दिल्यानंतरही बीसीसीआय ७६ सामन्यांमध्ये संपूर्ण स्पर्धेचं गणित जमवू शकते. त्यामुळे २०२३ पर्यंत ९ संघांनिशी खेळल्यानंतर पुढच्या हंगामात १० वा संघ आयपीएलच्या मैदानात उतरु शकेल.” BCCI मधील सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला माहिती दिली.

बीसीसीआयने या नवीन संघांसाठी २ हजार कोटी ही रक्कम ठरवली असून हे नवीन संघ नेमके कोणते असतील याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. १ डिसेंबरला आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची सर्वसाधारण बैठक पार पडली जाणार आहे, या बैठकीत नवीन संघांना संधी देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci contemplating making indian premier league 9 team tournament from 2020 season psd
First published on: 21-11-2019 at 15:37 IST