भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बिहार क्रिकेट असोसिएशनला (कॅब) लवकरच मान्यता मिळणार आहे. त्यामुळे बिहारमधील क्रिकेटपटूंना रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत सहभागी होता येईल, असा आशावाद सचिव आदित्य वर्मा यांनी प्रकट केला आहे.
‘‘बिहार क्रिकेट असोसिएशनला मान्यता मिळण्यासाठी आम्ही बराच काळ पाठपुरावा करीत होतो. अखेर आमच्या प्रस्तावावर आता शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे दिसत आहेत,’’ असे वर्मा यांनी सांगितले.
वर्मा यांनी नुकतीच बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन बिहार क्रिकेट असोसिएशनला मान्यता देण्याची विनंती केली.