भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. ४६.१ षटकांच्या खेळात न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर मैदानात पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. मात्र अशा सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यास आयसीसीचे काही नियम असतात. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात.. For those wondering, here's what happens if the match can't be completed today Ball-by-ball: report: #INDvNZ | #CWC19 pic.twitter.com/T9J12rMnIt— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 9, 2019 दरम्यान पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलचं अडकवून ठेवलं. कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतक झळकावलं.