इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना करोनाची लागण झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि आर श्रीधर हेदेखील करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तिघांचीही आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तिघांनाक्वारंटाइन करण्यात आले असून भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच शास्त्री पॉझिटिव्ह आले होते. आता त्यांना १० दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. भरत अरुण आणि श्रीधर हे शास्त्रींच्या संपर्कात होते आणि त्यांनाही आता लंडनमध्येच क्वारंटाइन व्हावे लागेल. शास्त्री यांची ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी करोना चाचणी करण्यात आली, ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर ते क्वारंटाइन झाले. त्यांच्याव्यतिरिक्त, इतर चार सपोर्ट स्टाफ सदस्यांना देखील वेगळे केले गेले. चौथ्या दिवसाच्या खेळापूर्वी सर्व खेळाडूंची दोनदा चाचणीही घेण्यात आली, चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना खेळण्याची परवानगी देण्यात आली. Nitin Patel, the physiotherapist who is also isolating as a close contact, is understood to have received a negative result. — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 6, 2021 हेही वाचा - ENG vs IND : झेल सोडला की सामना?, महत्त्वाच्या क्षणी मोहम्मद सिराजनं केली घोडचूक! पाहा VIDEO मँचेस्टरमध्ये होणाऱ्या मालिकेच्या पाचव्या म्हणजेच शेवटच्या कसोटी सामन्यासाठी शास्त्री यापुढे संघासोबत असणार नाहीत. एवढेच नव्हे, तर क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या दोन चाचण्या होणार आहेत. त्यांच्याशिवाय, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर पाचव्या कसोटी सामन्याचा भाग असणार नाहीत.