गेल्या वर्षी पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे मला क्रिकेटला मुकावे लागले होते, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमुळे मी लयीत आलो असून याचा फायदा नक्कीच होईल, असे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने सांगितले.
‘‘माझ्या मते मी हळूहळू का होईना, पण लयीत आलो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीने मी आनंदी आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मला चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण अखेरच्या दोन सामन्यांमध्ये मला सूर सापडला. एकंदरीत या कामगिरीने मी समाधानी आहे. याचा फायदा चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी नक्कीच होईल,’’ असे इशांतने सांगितले.