अजिंक्य भारताला अखेर विश्वचषक स्पर्धेत पराभवाचे तोंड पाहावे लागले. लियाम प्लंकेट आणि ख्रिस वोक्स यांनी टिच्चून मारा करत विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला विजयपथावर आणलं आहे. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३०६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. इंग्लंडने ३१ धावांनी सामन्यात बाजी मारत उपांत्य फेरीसाठी आपलं आव्हान जिवंत ठेवलं. इंग्लंडचा साखळी फेरीत आता न्यूझीलंडशी सामना होणं बाकी आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या जागी ऋषभ पंत याला संधी मिळाली. पण पंत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. कर्णधार कोहली माघारी परतल्यानंतर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्यावेळी भारताला जलद धावा करण्याची गरज होती. पण त्याला ते शक्य झाले नाही. १९ चेंडूत २२ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर त्याच्या समावेशावरुन अनेक चर्चा रंगल्या. World Cup 2019 : ख्रिस वोक्सने घेतला ऋषभ पंतचा भन्नाट झेल सामन्यानंतर रोहित शर्माने घेतल्लेया पत्रकार परिषदेत त्याला पत्रकारांनी पंतबाबत प्रश्न विचारला. "जेव्हा भारताला फटकेबाजीची गरज होती आणि कर्णधार कोहली बाद झाला. त्यावेळी फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पांड्या च्या जागी ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर अचानक फलंदाजीला आलेला पाहून तुला आश्चर्य वाटलं नाही का?" असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. त्यावेळी रोहितने दिलेल्या उत्तराने सगळीकडे हशा पिकला. "मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. तुम्हा सगळ्यांना ऋषभ पंत संघात हवा होता, बरोबर ना? तुम्हीच नाही तर सगळ्या भारताला ऋषभ पंत संघात हवा होता. तुम्ही सारखं विचारत होतात की ऋषभ पंत कुठे आहे? .. हा घ्या तो चौथ्या क्रमांकावर आहे", असे मिश्किल उत्तर रोहितने दिले. Vice-captain @ImRo45 lightened up the post-match press conference when asked about Rishabh Pant #TeamIndia #ENGvIND #CWC19 pic.twitter.com/NSv3zVqFT3 — BCCI (@BCCI) June 30, 2019 दरम्यान, ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल एकही धाव न काढता माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. रोहित-विराटची जोडी भारताला विजय मिळवून देईल असं वाटत असतानाच लियाम प्लंकेटने विराटला माघारी धाडलं. त्याने ६६ धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितने आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र इतर कोणत्याही खेळाडूने जबाबदारीने खेळ केला नाही. त्यामुळे भारताला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडकडून प्लंकेटने ३ तर वोक्सने २ बळी घेतले. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो याने आक्रमक शतक केले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.