बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या दीपक चहरने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. आपल्या आधीच्या क्रमवारीवरून ८८ अंकानी झेप घेत दीपक चहर थेट ४२ व्या स्थानी पोहचला आहे. बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात दीपकने ३.२ षटकांत ७ धावा देऊन ६ बळी घेतले होते.

अवश्य वाचा – चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला, पंतचा पत्ता कट ! मुंबईकर श्रेयस अय्यरला पसंती

दीपकची ही कामगिरी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. याचसोबत टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून हॅटट्रीक नोंदवणारा दीपक पहिला गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे आगामी कालखंडाच दीपक चहर आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर आणखी किती प्रगती करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – भारताच्या मालिकाविजयावर कर्णधार रोहित खुश, गोलंदाजांना दिलं श्रेय