२०१९ वर्षाच्या अखेरीस आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली. ज्यात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी आपलं पहिलं आणि चौथं स्थान कायम राखलं आहे.

अवश्य वाचा – शरद पवार हे आपल्या सर्वांसाठी माऊंट एव्हरेस्ट – अजिंक्य रहाणे

मात्र भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेची एका स्थानाने घसरण झाली असून तो सातव्या स्थानी घसरला आहे. तर श्रीलंकेविरुद्ध मालिकेत धडाकेबाज कामगिरी करणारा पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या स्थानी आला आहे.

भारतीय संघाने २०१९ वर्षातला आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. २०२० साली भारत न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात भारत २ कसोटी सामने खेळणार आहे, ज्यासाठी सरावाकरता अजिंक्यची भारत अ संघातही निवड करण्यात आली आहे.